कै. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन
भजन स्पर्धेची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल
कुडाळ | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठी संतांची परंपरा लाभली आहे या संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ जपत आहे. ही सर्वात मोठी कौतुकाची बाब असल्याचे ॲड. सुहास सावंत यांनी श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगून ही भजन स्पर्धा सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. हे सुद्धा अभिमानास्पद आहे असे त्यांनी सांगितले.
श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. सुहास सावंत, अमेय देसाई, विजय देसाई, माजी सरपंच अरविंद शिरसाट, नगरसेवक अभिषेक गावडे, मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, नारायण राऊळ, ॲड. उमा सावंत, परीक्षक शहाबुद्दीन शेख, संजय दळवी, महेश कुडाळकर, सुरेश राऊळ आधी उपस्थित होते.
या स्पर्धेचे यावर्षीचे ४९ वे वर्ष आहे पुढच्या वर्षी या स्पर्धेला ५० वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष असणार आहे. भजन स्पर्धेमध्ये एवढ्या वर्षांचे सातत्य ठेवणे कठीण आहे. पण हे मंडळ हे सातत्य राखून आहे. आणि नवीन कलाकारांना वाव मिळत आहे. भजन परंपरा आणि संस्कृती जपण्याचे काम हे मंडळ करीत आहे. हे कौतुकास्पद आहे. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केले.
