कणकवली,3आँक्टो*
माजी आमदार वैभव नाईक हे अनुसूचित जातीच्या जनतेचा मान ठेवणारे नेते आहे जिल्हाच्या विकासात अनुसूचित जाती च्या जनतेला कायम पाठीशी राहून न्याय मिळवून देतात परंतु खरोखरच आमच्या अनुसूचित जाती समाजाच्या बांधवावर अशा प्रकारचे जातीवाचक प्रकार घडतात तेव्हा हेच प्रशासन गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला आठ-आठ दिवस हेळसांडे मारावास लावतात परंतु महामार्ग दुरावस्था हा जनतेचा प्रश्न मांडत असताना संबंधित अधिकारी यांनी स्वतः मागासवर्गीय असल्याचा फायदा उठवून वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकारी प्रशासनाचे काम करत असताना तो कोणत्याही जाती धर्माचा नसतो तर तो एक भारतीय नागरिक व जनतेचा नोकर असतो हे विसरला व आपण अनुसूचित जाती समाजातील आहे याचा फायदा घेऊन आपल्या कामचुकार पण लपवण्याचे प्रयत्न करत आहे. संबंधित अधिकारी यांने जातीचा वापर चुकीचा करू नये त्यामुळे सिंधुदुर्गातील अनुसूचित जाती व मराठा समाज यांच्या मध्ये दुरावा निर्माण होईल . आणि सामान्य जनतेचा कायद्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेले तरी त्यांनी वेळीच आपली चूक सुधारावी
अन्यथा अनुसूचित जाती समाजाच्या मोर्चाला सामोरे जावे.
*सुजित जाधव*
*जिल्हाध्यक्ष, चर्मकार समाज सिंधुदुर्ग जिल्हा*


